नाशिक (दि.7 प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
Oplus_131072
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामाच्या नगरीत वसलेली गोदावरी नदी जी नाशिकची भूषण म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.त्या नदीची परिस्थिती पाहता तिच्यामध्ये अनेक ठिकाणावरून नाल्याचे गटारीचे सांडपाणी सोडले जात आहे यामुळे नदीचे पाणी अधिकच घाण होत चालले आहे यामुळे मानवी आरोग्यावरही याचा घातक परिणाम होऊ लागला आहे.
तसेच महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांबद्दल जे समाजकंटक चुकीचे वक्तव्य करतायेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन त्यासाठी शासनाने त्वरित कडक कायदा करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.प्रशासनाने लवकरात लवकर कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.यावेळी नाशिक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख रेखाताई जाधव,महानगर प्रमुख रोशन खैरे,कार्यकारी सदस्य पुष्पाताई जगताप,विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख सागर पवार,उपमहानगरप्रमुख रागिनीताई आहेर,विशाल पवार, जिल्हा संघटक संदीप आवारे, स्नेहाताई नवसे,सोनलताई म्हासदे व पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.