अहिल्यानगर (दि.10 प्रतिनिधी):- शहरातील मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्यास आंबेडकर घराण्याला शासकीय आमंत्रित करण्यात यावे याबाबत आमदार संग्राम जगताप यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, शहर जिल्हा महासचिव अमर निरभवने,प्रवीण ओरे शहर जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा सल्लागार जे.डी.शिरसाठ, ॲड.योगेश गुंजाळ,भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे,उपाध्यक्ष गणेश राऊत,विजय कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आपल्या कार्यकाळात अहिल्यानगर शहरातील 30 वर्षापासून प्रलंबित असलेला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होत आहे याचा आम्हाला आनंदच आहे.समस्त आंबेडकरवादी समाजाच्या मागणीला यश मिळाले असून समस्त आंबेडकरवादी भीमसैनिकांच्या मागणीची आपण दखल घेऊन हे शुभकार्य आपण पूर्णत्वास आणले आहे. त्याबद्दल आपले पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार.आपल्या कार्यकाळात असे शुभकार्य घडो व बहुजन समाजाला आपण योग्य न्याय द्यावा ही सदिच्छा बाळगतो.तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची बैठक दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल राजयोग अहिल्यानगर येथे पार पडली.
त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय समितीच्या वतीने घेण्यात आले आहे.सदर बैठकीत 20 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत पूर्णाकृती पुतळा अनावरण करण्याचे आयोजिले असून या सोहळ्यास समस्त आंबेडकरी चळवळीचे नेते यांना आमंत्रित करण्याचे ठरले आहे.या सोहळ्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा.खासदार ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रीय सल्लागार भारतीय बौद्ध महासभा) मा.भीमराव आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) मा.आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष) यांना आपण शासकीय आमंत्रण द्यावे व त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करावा त्याच बरोबर पूर्णाकृती पुतळा बसवताना बौद्ध समाजाचे धम्म भंते संघ यांना देखील आमंत्रित करण्यात यावी अशी आम्ही पक्षाच्या वतीने आपणास विनंती करतो.
अहिल्यानगर या ऐतिहासिक शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याचे इतिहासात नोंद होणार आहे आपल्या कार्याची नोंद चिरकाल आबादीत राहावी.या सुवर्णक्षणाची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नक्कीच लिहिली जाईल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची मूल्यतत्त्वे जोपासणारा त्यांचे अनुकरण करून इथल्या वंचित बहुजन समाजाला न्याय देणारा धर्मनिरपेक्ष असा लोकप्रतिनिधी द्वारे आपण या सोहळ्यास आमंत्रित करावे.जेणेकरून समाजात आपल्या कार्याचीं दखल तसेच योग्य संदेश जाईल या हेतूने आपण सोहळ्याचे नियोजन करावे ही व विनंती.