अहिल्यानगर (दि.26 प्रतिनिधी):- वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यामध्ये बेवारस पडलेल्या गाड्यामुळे तक्रारदार किंवा पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने लावण्यास अडचण निर्माण होत असते बऱ्याच वेळा गाड्या लावण्यासाठी जागा ही नसते.
यामुळे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पोलीस स्टेशन परिसरात बऱ्याच वर्षापासून अपघातातील,गुन्ह्यातील व बेवारस पडलेल्या गाड्या गाड्या ज्यांच्या आहेत त्या मालकांनी गाड्यांचे कागदपत्रे दाखवून 7 दिवसात गाड्या घेऊन जाव्यात अन्यथा या गाड्या घेऊन न गेल्यास 7 दिवसांनी सरकारी प्रक्रिया पूर्ण करून या गाड्यांचा निलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले आहे.