संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुका रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तसेच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि जनसंवाद चॅनेलचे संपादक पत्रकार दत्तत्रय घोलप यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी तळेगाव दिघे येथिल वळण पूलाला संरक्षक कठडे बसवण्यात यावी अशी मागणी संबंधित महामार्ग प्रशासनाकडे करून थेट संपर्क साधत पाठपुरावा केला होता.
याचीच तात्काळ दखल घेत NH 160 D लोणी-नांदूर शिंगोटे महामार्गावरील तळेगाव नजीक असणाऱ्या वळण पूलावर कठाडे बसवण्याचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे.. चार-पाच दिवसात पूर्ण होणार आहे.अहिल्यानगर येथील संबंधित महामार्ग विभागाचे अभियंता अनिल गोरड साहेब यांनी तात्काळ दखल घेत संरक्षण कठाडे बसवणे कामास आदेश देतात कामास प्रारंभ झाला आहे.याबद्दल तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने युवा पत्रकार दत्तात्रय घोलप व अभियंता अनिल गोरड साहेब यांचे तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे,रयत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश दिघे, काकडवाडी गावचे माजी सरपंच जनार्दन कासार,सुनीलभाऊ दिघे,निलेश दिघे,विजय दिघे यांनी आभार व्यक्त केले आहे.लवकरच लोणी नांदूर शिंगोटे महामार्गाच्या प्रास्तावित असणाऱ्या फोर लेनचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी बोलताना पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केली आहे.