संगमनेर (दत्तात्रय घोलप):-अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र.मांदळी येथील लालगिरी बुवा ट्रस्ट मठातील बालब्रह्मचारी,ब्रह्मरूप विदेही,गेल्या 24 वर्षापासून तपसाधनेत असलेले महान तपस्वी महंत स्वामी आत्मारामगिरीजी महाराजांचे 29 एप्रिल 2025 रोजी संगमनेर तालुक्यातील तळेगाव,चिंचोली गुरव,काकडवाडी,नान्नज दुमाला,पोखरी,समनापुर,कौठे कमळेश्वर आदिंसह अनेक गावांमध्ये बाबाजींच्या व्हॅनवर फुलांची पुष्पृष्टी करून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात अनोखे स्वागत करण्यात आले.
एखाद्या मंत्र्याच्या ताफ्याल्याही लाजवेल असा महंत आत्मारामगिरी महाराजांचे भक्त परिवाराचा ताफा यावेळी बघ्याला मिळाला.स्वामी आत्माराम बाबांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.यामुळे बाबाजींचा हा स्वागत सोहळा “न भूतो न भविष्यती असाच झाला”.. बाबांच्या आगमनाने व पदस्पर्शाने परिसरात व भक्त परिवारात उत्साहाचे वातावरण होते.यावेळी उपस्थित सर्वच भाविक भक्त नागरिकांनी बाबाजींच्या दर्शनाचा लाभ घेतला.स्वामी आत्मारामगिरी बाबांच्या स्वागतासाठी ढोल पथक,लेझीम पथक,भजनी मंडळे,कलशधारी महिला,जेसीबीतून फुलांची उधळण, रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी,प्रचंड रखरखत्या उन्हात बाबाजींच्या दर्शनाची आस लागून असलेली भविकांची गर्दी.या सर्व गोष्टींनी स्वामी आत्माराम बाबांचा स्वागत सोहळा अविस्मरणीय ठरला आहे.सर्व गावकऱ्यांनी व भक्त परिवाराने स्वामी आत्मारामगिरी बाबांचे जल्लोषमय वातावरणात भक्तीभावाने स्वागत केले.
ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.स्वामी आत्माराम बाबांच्या भेटीने संपूर्ण परिसरात नवचैतन्य पसरले आहे.प्रथमच महान तपस्वी स्वामी आत्मारामगिरी महाराजांचे पदस्पर्श झाल्याने व दर्शनाचा योग आल्याने भाविकांचा आनंद व ओसांडून वाहत होता.हा सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्मारामगिरीजी महाराज भक्त परिवाराने विशेष परिश्रम घेतले आहे.