अहमदनगर (दि.१४ सप्टेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राजूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांचे पैसे चोरणाऱ्या टोळीस पोलिसांनी तपास करत जेरबंद केले आहे.विशेष म्हणजे हि टोळी महिलांची असून या महिलांच्या आंतरराज्य टोळीला राजूर पोलिसांनी पंढरपूरमधून अटक केली आहे.
मधुकर नामदेव बांडे (वय ५५, रा.शेंडी,ता.अकोले) यांनी बँकेतून ५० हजार रुपये काढले होते.त्यांनी त्यांच्या जवळील बंद पिशवीत ठेवलेले पैसे बाहेर घेऊन जात असताना पिशवीला कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते.
मधुकर बांडे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून मपोना/सुवर्णा शिंदे,पोना/रोहिणी वाडेकर,दिलीप डगळे,गाडे यांच्या पथकाने आरोपी बिंद्या अजय छायल,सुपमा गौतम छायल (रा.कडिया सांसी,ता. पचोर,जि.राजगड,मध्यप्रदेश) यांना जेरबंद केले आहे.तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम २५ हजार रुपये हस्तगत केले आहेत.
