नाशिक प्रतिनिधी (आशाताई मोरे/कर्डक):-परभणी जिल्ह्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक असलेल्या संविधानाच्या कोनशिलेची समाजकंटकाकडून विटंबना झाल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची पोलिसांनी केलेल्या मारहाणी मुळे पोलीस कोठडीत हत्या झाली.
आणि परभणीमधील समाज बांधवांवर अमानुषपणे कॉम्बिग ऑपरेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला गेला.याच दरम्यान कालकथीत विजयदादा वाकोडे यांना या घटने दरम्यान लढा देता देता हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ व न्याय मागण्यासाठी..
मागील महिनाभरापासून जवळपास ४०० किमी पर्यंत पायी प्रवास करत आशिषभैया वाकोडे ,सुधीरभैया साळवे व परभणीतील समाज बांधव काल ७ फेब्रुवारी२०२५ रोजी नाशिक मध्ये दाखल झाले.नांदूरनाका मार्गे बुद्धलेणीवर येऊन हा लॉंगमार्च विसावला होता.पायी चालल्यामुळे बऱ्याच बांधवाना पायाला सूज व जखमा झाल्या कारणाने त्यांच्या पायांना आराम म्हणून जयभीम ब्रिगेड कार्याध्यक्ष ऍड.प्रतीक कर्डक यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या टीमने चरण सेवा अर्थात पायांची मसाज व मोफत औषधे हा उपक्रम बुद्ध लेणीवर राबवण्यात आला होता.त्यात परभणीमधील भगिनींनी आणि बांधवानी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या प्रसंगी बाळासाहेब कर्डक,कविताताई कर्डक,जयभीम ब्रिगेडचे समन्वयक राजूभाई दाहीजे, अरविंद गांगुर्डे,रवींद्र वाघ,अजय निकम,आशीर्वाद धिवरे,मुकेश झनके,भाऊसाहेब दिवे,किशोर महाले,लक्ष्मण शिंदे,विशाल तांबे, रोशन सोळशे,राकेश खैरनार आदी उपस्थित होते.