नगर (प्रतिनिधी)-:-शहराच्या लालटाकी परिसरातील आप्पूहत्तीचा पुतळा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आहे, त्याच जागेवर पुनरस्थापना करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या शिष्टमंडळाने मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी राज्यअध्यक्ष अशोक सब्बन,जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे,शहराध्यक्ष रईस शेख, तालुका अध्यक्ष पोपटराव साठे, बबलू खोसला,केशव बरकते, वीरबहादुर प्रजापती,विजय शिरसाठ,शिवाजी बेलोटे,कैलास पठारे माजी सरपंच,नलिनी गायकवाड,ॲड.विद्या जाधव-शिंदे,अजित कटारीया, दिलीप घुले,संगीता खिलारी, विनय अंबादास जाधव, बाळासाहेब पालवे,राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते आदी उपस्थित होते.1982 साली भारतामध्ये प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्ली येथे भरविण्यात आल्या होत्या त्याचे बोध चिन्ह हे अप्पू हत्ती होते.