अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भगवान महावीरस्वामी जन्म कल्याणक दि.१० एप्रिल २०२५ रोजी संपुर्ण भारतात साजरी केली जाणार आहे.भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा,जगा आणि जगु द्या हा संदेश दिला.भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया चे एच ए डब्ल्यू आर सदस्य तथा मिशन सेफ विहार चे अध्यक्ष इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी महाराष्ट्र शासन तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय यांना याबाबतीतला महाराष्ट्र शासन निर्णय,तथा ॲनीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे पत्र ईमेल द्वारे पाठवले होते.तसेच याबाबत फोनवरून जिल्हा प्रशासनास विनंती देखील केली होती.
त्याला अनुसरून महा.शासन निर्णय नुसार दि.१०/४/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे.या आदेशाची कडक अंबलबजावणी करण्याबाबतचे संबंधित सर्व प्रशासन विभागाला पत्रक देखील जिल्हाप्रशासनाने तात्काळ जारी केले आहे.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हापरिषद, अहिल्यानगर,मा.पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर, मा.आयुक्त,महानगरपालिका अहिल्यानगर,मा.उपायुक्त पशुसंवर्धन,अहिल्यानगर,सर्व उपविभागीय दंडाधिकारी,सह आयुक्त.नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर,तसेच सर्व – तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी या सर्वांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ई-मेल द्वारे आपल्या संबंधित विभागांमध्ये कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
यासोबतच यश शहा यांनी अहिल्यानगर महानगरपालिका तसेच जिल्हा पोलीस प्रशासन , जिल्हा पशुसंवर्धन विभाग व संबंधित सर्व विभागांना देखील ई-मेल व फोन द्वारे जिल्हा प्रशासनाचे आदेश पत्र पाठवले आहे व याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत विनंती देखील संबंधित सर्व विभागात केली आहे.शहा यांनी महाराष्ट्र शासन, मा.राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे या संदर्भातील पत्र पाठवुन या पत्राची अंबलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनास व संबंधित सर्व विभागाला शासन पत्रक जारी करावे अशी विनंती देखील केली आहे.