अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्या काळातील तुळजाभवानीच्या अवतार असाव्यात असा माझा विश्वास असून अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.अशी भावना नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष असून यावर्षी राज्य शासनाच्या वतीने नगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे राज्यातील महायुती शासनाच्यावतीने मी जाहीर करतो,अशी घोषणाही आमदार जगताप यांनी केली.
धनगर समाज सेवा संघाच्या पुढाकाराने सावेडीतील निर्मलनगर येथील गंगा लॉन्समध्ये धनगर समाजाचा नववा वधू-वर मेळावा झाला. त्याचे उदघाटन आ.जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वधु-वर मेळावा उपक्रम समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले,माजी नगरसेवक निखिल वारे,कुलगुरू भानुदास कुचेकर,माजी नगरसेविका कलावती शेळके व शारदा ढवण, सौ.शोभा दातीर,पार्वती तागड, सविता रणसिंग,धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड,सचिव सूर्यकांत तागड, खजिनदार निशांत दातीर,संतोष गावडे,सुभाष जाडकर,चेअरमन दत्तात्रय गावडे,अशोक राशीनकर,उत्तम सरगर,अनिल ढवण,काका शेळके विनोद पाचारणे,सोपान शिकारे,अक्षय वाघमोडे,सुदाम तागड, धोंडीभाऊ दातीर,विनायक नजन,भाऊसाहेब तोगे, तुकाराम मिसाळ,मोहन सरोदे, अक्षय भांड,वसंतराव दातीर, दशरथ लांडगे,इंजि.राजेंद्र पाचे, ज्ञानेश्वर घोडके, विजय शिपणकर, डॉ. नामदेव पंडित, मयुर राहिंज, गोवर्धन सरोदे, आण्णासाहेब बाचकर, इंजि.डी.आर.शेंडगे, राजेंद्र नजन, गोरख मंचरे, संदीप गवते उपस्थित होते.
अपार श्रद्धा आवश्यक
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्या काळातील तुळजाभवानीच्या अवतार असाव्यात, असा माझा विश्वास असून अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या जिल्ह्यातील या महिलेने इंदोर येथे होळकरांच्या गादीचा वारसा अत्यंत नेटाने सांभाळला. या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आग्रही व आघाडीवर होतो. त्यामुळे या नामांतरासाठी महायुती सरकारने घेतलेली भूमिका अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जिल्ह्यातील सामान्य जनतेलाही समजला पाहिजे याकरिता शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून मी स्वतः या कामासाठी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभर अनेक समाजभिमुख कार्य केले आहे. हिंदू धर्मासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूजनीय असून त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्यामुळे त्यांच्याप्रती आपण अपार श्रद्धा ठेवण कर्तव्य आहे, असे आवाहनही आ. जगताप यांनी केले.
पुस्तिकेचे प्रकाशन उत्साहात
धनगर समाजाच्या या वधू-वर मेळाव्यास जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातीलही वधू-वर, पालक उपस्थित होते. यावेळी वधू-वर नोंदणी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सिद्धार्थ तागड (युपीएसी परीक्षा उत्तीर्ण), अश्विनी सुदाम तागड (आर.एफ.ओ.-महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम), पूजा ठोंबरे (जलसंपदा, मंत्रालय, मुंबई), अशोक दिंडे (पोलिस उपनिरीक्षक), सोनाली काटकर (पोलिस उपनिरीक्षक), ललिता सातव (पोलिस उपनिरीक्षक), राहुल रामनाथ काळे (पोलिस उपनिरीक्षक), सागर नामदेव बलमे (पोलिस उपनिरीक्षक), विलास पा. दातीर (पोलिस उपनिरीक्षक), प्रशांत नवनाथ नजन (मुंबई पोलिस). सुनीता ठोंबरे (वनरक्षक) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी संस्कृती निशांत दातीर (96%-इ. 10 वी), समर्थ लक्ष्मण शेळके (अॅबॅकस परीक्षेत भारतात 5 वा) यांच्यासह समाजातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच एमआयटी कॉलेजचे कुलगुरू भानुदास कुचेकर इंजि. डी आर.शेंडगे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र तागड यांनी केले तर आभार इंजि.राजेंद्र पाचे यांनी मानले.