संगमनेर (दत्तात्रय घोलप):- संगमनेर तालुक्यातील पळसखेडे नजीक तसेच सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावाजवळ असणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठाजवळ सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात त्यामुळे याठिकाणी गत्तरोधक बसवण्याची अत्यंत गरजेचे बनले आहे.वारंवार याठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात.अनेकदा या अपघाताच्या घटनांमध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेलेले आहेत.
त्यामुळे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सदर अपघातग्रस्त ठिकाणी नाशिक-पुणे हायवेच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी श्री.स्वामी समर्थ माठाचे मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे,रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तसेच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांसह श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.तरी प्रशासनाने सदर अपघातग्रस्त ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसावे अन्यथा येणाऱ्या काळात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री. स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे.