अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वर्चस्व ग्रुप आणि हरे कृष्ण सत्संग यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ६ एप्रिल असे ७ दिवसीय श्री राम कथा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पुणे येथील इस्कॉन मंदिरातील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांच्या सुमधुर प्रवचनाने राम कथेचा महिला आणि पुरुष यांनी लाभ घेतला त्यांनी आपल्या प्रवचनात राम कथेचे अनेक गंभीर विषय एकदम सोप्या पद्धतीने समजावले.राम नामाचा महिमा आणि जपाचे महत्व सांगितले, लव जिहाद,धर्म निष्ठा यावर सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी खूप सुदंर कीर्तन आणि भजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला सर्वांनी नृत्य करून भगवान श्री राम जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी आरतीचे प्रमुख मा.नगरसेवक भैय्या गंधे,बाबासाहेब सानप, कमलेशजी भंडारी,महेंद्रभाई चंदे,सुनील भिंगारे,सुनील क्षेत्रे , बाळू साळवे,शरद मूर्तडकर, ज्ञानेश्वर डापसे,नंदू साळवे, सचिन दिवटे,धीरज पोखरना, विजय धात्रक,नितीन जोशी, मोहित रामनाणी,ज्ञानेश्वर साळवे, गजेंद्र सोनवणे,अमोल भांबरकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.या संपूर्ण श्रीराम कथा महोत्सव यशस्वी करण्यासाठी वर्चस्व ग्रुप चे अध्यक्ष सागर मुर्तडकर,बाली जोशी,सचिन दिवटे,भारत थोरात,भैय्या काशिद,विजय खांडरे,चेतन भिंगारे,वैभव गवळी,गणेश भिंगारदिवे,आकाश गवळी, आदर्श तिवारी,विकास अरुण, पवन शिंगटे,दिनेश दळवी,उमेश झेंडे,शैलेंद्र दुबे यांनी अथक परिश्रम घेतले.