अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.त्यातील २ दिवसात ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हा मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंकेनी केला.
खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली,त्याच बरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले,या १० भिक्षुकांपैकी ३ जण रुग्णालयातून पळून गेले,या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते,१० भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला,तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कैमरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी या वेळी केली.
नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा साधला खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले,ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला.