अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महावितरणकडून शनिवारी दि.२६ एप्रिल रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार पासून सलग तीन दिवस अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे.तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
शनिवार दि.२६-०४-२०२५
बोल्हेगाव,नागापूर,सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास [सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा रविवार दि.२७-०४-२०२५ रोजी करण्यात येईल.
रविवार दि. २७-०४-२०२५
मंगलगेट,रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळु बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर इ. भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि. २८-०४-२०२५ रोजी करण्यात येईल.
सोमवार दि.२८-०४-२०२५
पाणी पुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदीबाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इ. भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.२९-०४-२०२५ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.