नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे शालेय साहित्य वाटप,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध उपक्रमांचे आयोजन
नायगाव (अहिल्यानगर):-महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा मंडळ, नायगाव यांच्या वतीने सामाजिक भान जागृत करणारे विविध उपक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, नायगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. दीपक अण्णा पठारे पा. (मा. सभापती, पंचायत समिती श्रीरामपूर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळकृष्ण भोसले पा. हे होते. व प्रमुख पाहुणे नायगाव गावचे सरपंच डॉक्टर रा.ना.राशिनकर होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले, तर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. याशिवाय, दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित नागरिकांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
या वेळी भाषणात दीपक अण्णा पठारे यांनी आपल्या मनोगतातून माननीय विखे पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ पदासाठी नाही, तर गावागावच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या प्रेरणेने शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने, आणि विद्यार्थ्यांना आधार देण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले.”मा. नामदार विखे पाटील साहेब यांनी राज्यभरात जलसंधारणाच्या मोठ्या योजना राबवून ग्रामीण भागातील शेती आणि पाणी प्रश्नांवर दूरदृष्टीने काम केले आहे. त्यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेली जलसंधारण कामे आज महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर ठळक ठसा उमटवत आहेत. या योजनांचा लाभ लवकरच जनतेला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.कोविडसारख्या संकटाच्या काळातही साहेबांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत गरजूंना अन्न, औषधे आणि वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचवली. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, ते माणुसकीच्या सेवेचा एक आदर्श आहे.या अभिमानास्पद उपक्रमाचे सुंदर आयोजन श्री. सुभाष लांडे पाटील, ॲड. प्रशांत राशिनकर, श्री. ज्ञानेश्वर लांडे पाटील यांनी केले असून, साहेबांवरील त्यांचे प्रेम आणि आदर या उपक्रमातून ठळकपणे दिसून येतो. स्व. बाळासाहेब लांडे पा. मित्र मंडळ यांचेही या उपक्रमात विशेष योगदान राहिले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लबडे सर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.तंटामुक्ती अध्यक्ष सुनील लांडे गावचे ज्येष्ठ नेते भानुदास लांडे विद्यमान संचालक उत्तम राशीनकर सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेन लांडे व सुनील दातीर शैलेश खाटेकर शिवाजी नळे संजय ढवळे दत्ता नवले दीपक कैलासराव राशिनकर व गावातील अनेक मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.हा उपक्रम सामाजिक जाणीवेची जिवंत साक्ष देणारा असून, कर्तृत्व, कृतिशीलता आणि कृतीशील नेतृत्वाचा हा सन्मान नायगाव ग्रामस्थांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा ठरला आहे.