महाराष्ट्र नवनिर्माण मध्य विभाग सेनेच्या वतीने इ.10 वी व 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा
आशा मोरे/कर्डक (नाशिक प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक मध्य विभागाच्या वतीने इयत्ता 10 वी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा 2025 व मार्गदर्शन शिबिर परशुराम सायखेडकर सभागृह नेहरू गार्डन समोर शालिमार नाशिक. येथे नुकताच संपन्न झाला. प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून.व दीप प्रज्वलन करून. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभागातर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या या विषयीचे मार्गदर्शन. विशाल वीर. विजय कामत. राहुल आव्हाड. सचिन कदम. उदय बोडके इत्यादी अकॅडमीच्या संस्था चालकांकडून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून. हृदयरोग तज्ञ डॉक्टर धर्माधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील. प्रदेश अध्यक्ष सलीम मामा शेख. नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार. नाशिक शहर अध्यक्ष सुदाम आण्णा कोंबडे. माजी नगरसेविका सुजाताताई डेरे कार्यक्रमाचे आयोजक नाशिक मध्य विभाग मनसे अध्यक्ष सत्यम खंडाळे. हे उपस्थित विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभाग सचिव तथा विद्यार्थी प्रतिनिधी विराज हेमंत आंबेकर. मनसे नाशिक प्रभाग क्रमांक 12 शाखा अध्यक्ष शुभम विजय क्षीरसागर. अविनाश पाटील. अमोल मिसाळ. रोहित उगावकर. सुरेंद्र सोनार. राकेश परदेशी. विजय ठाकरे. अमित गांगुर्डे. जावेद शेख. सतीश अण्णा फडोळ. सागर जाधव. राकेश परदेशी. संतोष पाटील. विनायक नारखेडे. वर्धमान संचेती. यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. यावेळी नाशिक मध्य विभागातील दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.