रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अपात्र केलेल्या लाडक्या बहिणींचा राज्यसरकारला तळतळाट लागून सरकार पाय उतार होणार सामाजिक कार्यकर्त्या सरस्वतीताई घोडके
मिरजगांव (प्रतिनिधि):-2024 च्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे – फडणवीस – पवार , महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना मोठ्या डामाडौलात सुरू केली यामध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दीड हजार रुपये टाकण्यातही आले.ही योजना सुरू करताना काही नियम व अटी लागू केल्या असताना अनेक महिलांचे अर्ज बाद होतील अशी परिस्थिती सुध्दा होती.परंतु त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले की सर्वच महिला या योजनेसाठी पात्र असतील.मग त्याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असतील ,बागायत जमिनी असेल ,इन्कमटॅक्स भरत असतील.अशा कुटुंबातील ही सर्व महिलांना पात्र करण्यात आले .
एवढ्यावर न थांबता एकाच कुटुंबातील दोन महिलांनाही पाञ करून या योजनेचा लाभ देण्यात आला.याचाच अर्थ की या महायुतीने सत्तेत येण्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसा मुबलक उपलब्ध करून राज्यातील महिला व त्यांच्या कुटुंबातील मत मिळवण्यासाठी वापरला. लाडकी बहीण ही योजना सुरू केली व निवडणूक होऊन आता एक दीड वर्षातच ही योजना बंद करण्याचं कट कारस्थान सुरू केलेले आहे.कोणतेही कसलेही निकष सध्या लावून धडाधड लाडक्या बहिणींना अपात्र आणि योजनेचे पैसे वसुल करणे सुरू केलेले आहे.त्यामुळे काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण लाडक्या बहिणी लाभार्थी महिलांपैकी १ लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी महिलांचे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडकी बहिण योजनेचे प्रति महिना १५०० रू. एप्रिल पासून ते ऑगस्टपर्यंत थकीत ठेवून पैसे सध्या बंद झालेले आहेत.त्यामुळे या महिलांसह त्यांच्या कुटुंबातून प्रचंड रोष निर्माण होत असून आगामी निवडणुकांमध्ये या लबाड सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.अशी प्रतिज्ञा या लाडक्या बहिणी महिलांनी केलेली आहे. २०२४ विधानसभेची निवडणूक जिंकून सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा जुमला होता.असे आता सध्या राज्यातील जनतेला कळून चुकलेले आहे.
लाडकी बहीण योजने सह प्रत्येक सणाला मिळणारा आनंदाचा शिधा.तोही राज्य सरकारने सध्या बंद केलेला आहे. सध्या राज्य सरकारने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वापरातील गहू ,ज्वारी ,डाळी ,खाद्यतेल गोष्टींवरती .भरमसाठ टॅक्स वाढवून सामान्य नागरिकांचे जगणं मुश्किल केलेले आहे. पेट्रोल – डिझल ने शंभरी पार केलेली आहे. घरगुती गॅस ला सुध्दा जास्त रुपये मोजावे लागत आहेत.मोबाईल रिचार्ज प्रति महिना साडेतीनशे ते चारशे रुपये केलेले आहे. दैनंदिन गरजांचे खर्चाच्या प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीयां सह, शेतकरी, गोरगरीब यांच जगणं मुश्किल झालेला आहे.वाढत्या महागाईमुळे कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांनी , बेरोजगार युवकांनी आत्महत्या सत्र सुरूच केलेले आहे.यावेळी बोलताना मिरजगाव येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ.सरस्वती भगवानबाबा घोडके यांनी या सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत.येणाऱ्या निवडणुकांमध्ये फडणवीस,शिंदे ,पवार यांच्या महायुती सरकारला ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेतुन अपात्र करून नाराज केलेल्या बहिणींचा तळतळाट लागून हे सरकार सत्तेतून पायउतार होणार असे मत व्यक्त केले.