कोण होते ते ?…७ वर्षांसाठी कुख्यात टोळी प्रमुखासह जिल्ह्याबाहेर हद्दपार!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोपरगाव शहरात जिवे मारण्याचा प्रयत्न करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी कठोर कारवाई करत टोळी प्रमुखासह टोळीतील सदस्यांना हद्दपार केले आहे.सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.बातमीतील हकीकत अशी की, टोळी प्रमुख (1) सागर उर्फ मोदा रामदास मंजुळ,वय 26 वर्षे,रा.महादेवनगर, कोपरगाव,ता.कोपरगाव,जि. अहिल्यानगर,टोळी सदस्य (2) अतुल देविदास आळाड,वय 20 वर्षे,रा.गणेशनगर,कोपरगाव, ता. कोपरगाव,जि.अहिल्यानगर, टोळी सदस्य (3)भारत भास्कर आव्हाड,वय 22 वर्षे,रा.लिंबारा मैदान,कोपरगाव,ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर,टोळी सदस्य (4) नयन गोविंद शिंदे,वय 22 वर्षे,रा.गांधी नगर, कोपरगाव, जि. अहिल्यानगर, टोळी सदस्य (5)आकाश सदाशिव माकणे, वय 24 वर्षे, रा. लिंबारा मैदान, कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, टोळी सदस्य (6) विकी किशोर शिंदे, वय 20 वर्षे, रा. गांधी नगर, कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करून तिचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती.
सदर टोळीने गैर कायद्याची मंडळी जमवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडवून आणणे, अल्पवयीन मुलींमध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, गट जमवून दंगल करणे,गैर कायद्याची मंडळी जमवून अग्नी शस्त्रासह व घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे सराईतपणे केले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारी वाढत चालली होती.टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन 2020 ते 2024 या कालावधीत सराईतपणे गुन्हे केले असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती.टोळीच्या सततच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्ह्यांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार अथवा साक्ष देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते.सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता असल्याने संपूर्ण टोळीची पाळेमुळे उपटून दहशत कमी करण्यासाठी तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण कुंभार, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
सदर प्रस्तावाची श्री. अमोल भारती,उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग, जि.अहिल्यानगर यांनी चौकशी करून शिफारशीसह चौकशी अहवाल सादर केला. सदर प्रस्तावाची सखोल चौकशी करून टोळीप्रमुख (1) सागर उर्फ मोहा रामदास मंजुळ, टोळी सदस्य (2) अतुल देविदास आळाड व (3) भारत भास्कर आळाड यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून 07 वर्ष कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तसेच पुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्धही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
