नगर प्रतिनिधी:-यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास महत्वाचा गुण आहे.यश शिखर सर करणाऱ्या बहुतेकांमध्ये हा गुण आढळतो. आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल केल्यास जीवनास यशस्वी होता येते.असे प्रतिपादन उप-वनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले.भिंगार येथील छावणी परिषद शाळेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे गरीब व गरजू विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक राजू भोसले यांचे चिरंजीव मनोज भोसले यांच्या वतीने उप-वनसंरक्षक सुवर्णा माने,स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संजय शिंदे,मुख्याध्यापक राजू भोसले व शाळेतील शिक्षक शरद पुंड,अंकुश शेळके,अरविंद कुडिया, वैशाली शिंदे,सोनाली झिरपे,अश्विनी यादव आदी उपस्थित होते.
आयुष्यात ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा तुम्हाला यश निश्चित मिळेल असे गौरवोद्गगार सुवर्णा माने यांनी केले.यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले वंचित व गरीब मुलांसाठी मनोज राजू भोसले यांनी मुलांसाठी दिलेले गणवेश कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळते.
