अहमदनगर (दि.१२ ऑगस्ट):-पर्युषण महापर्वानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने तसेच सर्व प्रकारचे मांसविक्री केंद्र दुकाने दि.३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२४ या दोन दिवशी संपूर्ण जिल्ह्यात बंद ठेवण्याचे आदेश शासन निर्णयानुसार तथा ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया पत्रका नुसार जिल्हा प्रशासनाने यश शहा यांच्या ईमेलद्वारे केलेल्या मागणीनुसार पारित केले आहे.
या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक अहमदनगर जिल्हा,उपविभागीय दंडाधिकारी (सर्व), आयुक्त महानगरपालिका अ.नगर,जिल्हा प्रशासन अधिकारी शाखा अहमदनगर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी (सर्व) , पशुसंवर्धन विभाग अहमदनगर या सर्वांना उचित कार्यवाही तसेच कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे.
या साठी यश शहा भारत सरकार एच ए डब्ल्यू आर सदस्य ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया , अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख-अखिल भारतीय जैन श्र्वेतांबर गुजराथी समाज महासंघ,तथा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय जैन दि.मंच यांनी जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासन निर्णय ऑर्डर कॉपी तथा ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे मा.सर्वोच्च न्यायालय आदेश अपील पत्र निर्णयाला अनुसरून परिपत्रक सोबत जोडून जिल्हा प्रशासनास याबाबत ई-मेल पाठवला होता.
तसेच फोन वरून याबाबत जिल्हा प्रशासनास विनंती केली होती.शहा यांचा ई-मेल तथा महाराष्ट्र शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हा आदेश अहमदनगर जिल्ह्यासाठी पारित केलेला आहे. यश शहा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कार्यालय तथा पशुसंवर्धन विभाग तसेच गृह मंत्रालय यांना संबंधित सर्व विभागांना याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना करावी अशी विनंती ई-मेलद्वारे केलेली होती. तसेच अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी विनंती शहा यांनी पोलीस अधीक्षक,महानगरपालीका आयुक्त तसेच जिल्हा परिषद अधिकारी यांना फोन द्वारे तथा ई-मेल द्वारे केलेली होती.