अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नुकत्याच विधानसभेच्या निवडणूका झाल्या असून बहूमतात आलेल्या महायुती सरकारच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.या अनुषंगाने नव्याने गठीत होणार्या मंत्रिमंडळात पक्षाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देणारे पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केली आहे.
पत्रकात पुढे नमूद करतांना सुमेध गायकवाड म्हणाले की, मागील लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पीपल्स रिपब्लीकन पार्टी महायुतीसोबत होती.या दोन्ही निवडणूकीत राज्यात पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करुन महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिले आहेत. महायुतीच्या या यशात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचा सिंहाचा वाटा आहे.एैन निवडणूकीत अपघात झाल्यानंतरही जयदीप कवाडे हे संपुर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी फिरले.या नेत्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना नव्याने गठीत होणार्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान देवून त्यांचा कार्याचा सन्मान करावा अशी मागणी पत्रकाव्दारे केली आहे.
तसेच जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहे त्त्यामुळे जिल्हानिहाय समित्यावर देखील कार्यकर्त्यांची वर्णी लावावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,संपर्क प्रमुख नितिन कसबेकर,महिला जिल्हाध्यक्षा सौ.गौतमी ताई भिंगारदिवे,विशाल गायकवाड,नितीन साळवे,रौफ कुरेशी,विलास गजभिव,मधुकर पवसे,संजय उन्हवणे,अनिल पलघडमल,संजय साळवे,किरण गायकवाड,यादव त्रिभुवन,महेंद्र साळवे,कमलेश साळवे,सिद्धार्थ राजगुरु,शाहिद शेख आदी प्रमुख कार्यकर्ते यांनी केली आहे.