पारनेर (प्रतिनिधी):-पारनेरच्या जनतेने ज्यांना ज्यांना संधी दिली खुर्ची दिली त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलय अस चित्र निर्माण झाल आहे.पारनेरच्या सर्व सामान्य जनतेचे हाल होत असताना पारनेरचे पुढारी गप्प का? तालुक्यात पोलिस स्टेशन असो किंवा शासकीय कार्यालय नविन अधिकारी आले का अनेकजण पुष्पगुच्छ देवून फोटोसेशन करतात मग आता पारनेर तहसिलवर कागदही हालायला तयार नसताना हे पुष्प गुच्छवाले कुठे गायब झालेत? असा सवाल मनसे नेते अविनाश पवार यांनी केला आहे.
पारनेर तहसील कार्यालयात सर्व सामान्य गोर गरीब शेतकरी बांधवांची रस्ता केस संदर्भात अव्हेलना होत आहे सर्व सामान्य शेतकरी माणसाला गृहीत धरून हे महसुल कर्मचारी उडवा उडविची उत्तरं देत असल्यानं कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात हे दुर्दैवी आहे पारनेर तालुक्यातील राजकीय अराजकतेचा अधिकारी व कर्मचारी यांनी गैर फायदा घेतला आहे तरी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी वर्गांनी मदत करावी अन्यथा मनसे स्टाईल हिसका दाखवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी संताप व्यक्त करीत असा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. शेतकरी,शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्यानंतर रित सर पत्र व्यवहार करुन एक महिला अधिकारी म्हणून सन्मान देत संयमाने घेत आज उद्या काम काजात बदल होईल अशी अपेक्षा असताना दोन अडीच वर्षे पूर्ण झाली तरीही तहसील कार्यालयात काहीही बदल होत नाही तहसील कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना उडवा उडविची उत्तरं देतात कर्मचारी उपस्थित असताना सुद्धां आज साहेब आले नाही बाहेर आहे अशा प्रकारे स्वतः तोच कर्मचारी उत्तर देतो हे घृणास्पद आहे.
तहसील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयडी कार्ड घालणं बंधनकारक असताना सुद्धां घालत नाहीत सर्व सामान्य माणसाला किरकोळ कामासाठी हेलपाटे मारावे लागतात रेशनकार्ड,नाव समाविष्ट नोंदणी,दुबार, ऑनलाईन करण्यासाठी,विभक्त करण्यासाठी,नविन रेशनकार्ड काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तसेच सेतू केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम नागरिकांची, शालेय विद्यार्थी ची विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी लुट होत असताना पत्र व्यवहार करुन सुद्धां कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही तसेच सेतू केंद्राच्या नावाने बोगस सेतू सुविधा केंद्र थाटली आहेत सेतू केंद्रात माहितीची सनद लावणं बंधनकारक असताना सुद्धां कोणत्याही केंद्रात याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अव्वाची सव्वा रुपये घेऊन गरीबांना लुटलं जात आहे पारनेर तालुक्यात तहसीलच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले जाते आहे खुलेआम महसुल बुडवून लाखो रुपयांची उलाढाल होत असताना तहसीलदार यांना लेखी पुराव्यानिशी तक्रार दाखल करुन सुद्धां कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यामुळे पारनेर तहसील कार्यालय अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे पारनेर तालुक्यात गोरं गरिबांना स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नाही कोठा कमी असल्याने काही करु शकत नाही उत्तरं देत आहे आणि रेशनिंग चा काळाबाजार होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शनास आणून दिले असताना सुद्धां कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही याचा अर्थ काय…महसुल प्रशासन निशक्रिय झाले आहे की महसुल प्रशासनाच्या कृपा आशिर्वादाने हा अवैंध गोरख धंदा जोरदार चालू आहे याबाबत लवकरच जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती मांडणार असल्याचे पवार यांनी सांगितले.