संगमनेर (प्रतिनिधी):-तळेगाव-संगमनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या लोणी-नांदूर शिंगोटे हायवे वरील नान्नज दुमाला चौफुलीवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याकारणाने सदर ठिकाणी दोन्ही बाजूंना गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केली आहे.
वारंवार मागणी करून देखील याठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले नाही याठिकाणाहून लोणीच्या मार्गे तसेच नांदुर-शिंगोटे मार्गे वाहने हे भरधाव सुरू असतात. सदर भागात चौफुलीचा असल्याकारणाने याठिकाणी रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे.त्यामुळे सातत्याने याठिकाणी लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात. महामार्गावरील वाहनांचा वेग लक्षात येत नाही.
संभाव्य अपघाताच्या घटना घडविणे याकरता संबंधित महामार्ग प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर नान्नज दुमाला गावच्या नजीक असणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटे हवेवर दोन्ही बाजूने चौफुलीवर गतिरोधक बसवावेत अन्यथा येणाऱ्या काळात प्रशासनात कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार दत्तात्रय घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.