शेवगाव (अविनाश देशमुख):-शेवगांवच्या रणरागिणी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती विद्याताई गाडेकर यांनी विस्थापित झालेल्या टपरी धारकांसाठी पाच दिवस निकराची लढाई दिली त्यात त्यांना यश मिळाले आहे.यावेळी मुख्याधिकारी श्रीमती.विजया घाडगे म्हणाल्या की,ज्यांचे जागेचे पुरावे असतील ते अतिक्रमण पाडणार नाही,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.प्रल्हाद पाठक यांनी आश्वासन दिले आहे.
गेल्या पाच दिवसापासून टपरी धारकांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेले उपोषण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले.शेवगावच्या क्रांती चौकामध्ये टपरी धारकांचे पुनर्वसन करा !या मागणीसाठी शेवगाव तहसील कार्यालया समोर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रवक्त्या व महिला ओ.बी.सी.सेलच्या राज्य उपाध्यक्षा श्रीमती.विद्या भाऊसाहेब गाडेकर या गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसल्या होत्या.सोमवार दि.०३ मार्च रोजी खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन शेवगाव बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक,शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याशी व उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून त्यानंतर लेखी हमीचे पत्र घेऊन उपोषण काही काळासाठी स्थगित केले.
यावेळी खासदार निलेश लंके यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे हेही हजर होते.उपोषण स्थळी खासदार लंके यांनी उपोषणकर्ते व टपरीधारक तसेच प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून शहरातील मोकळ्या जागांचा अहवाल मागून त्यावर काय प्रस्ताव तयार करता येतील? व पुढे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ? या संदर्भात चर्चा केली.यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे उपोषणकर्ते व टपरीधारक यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन विद्याताई गाडेकर यांचे उपोषण मागे घेण्यात आले.तसेच बांधकाम विभागाचे अभियंता प्रल्हाद पाठक यांनी जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये ज्या अतिक्रमणाच्या नोटीस गेलेले आहेत.त्या भागामध्ये ज्यांच्याकडे आपल्या जागेच्या संदर्भात पुरावे असतील त्यांनी ते सादर करावे.जेणेकरून त्या अतिक्रमण धारकावर कारवाई होणार नाही.असे लिखित पत्र पाठक यांनी उपोषणकर्ते विद्या गाडेकर यांना दिले व नंतर हे उपोषण खासदार लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन मागे घेण्यात आले.