माढा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखल फेक करून बदनामी करण्याचे षडयंत्र करत आहे.या प्रकरणाला जवळजवळ दहा वर्ष उलटून गेले आहेत आणि सदर केसमध्ये न्यायालयाने मंत्री गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीपण सदर महिला पुन्हा पुन्हा सदरील प्रकरण उकरून काढून जयकुमार गोरे यांची बदनामी करत आहे.सदर महिलेने न्यूज चैनलला व तसेच वर्तमानपत्रात मुलाखत देऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले परंतु त्याबाबतीतही काय निर्णय झाला हे समजणे महत्त्वाचे आहे.
तसेच सदरील महिलेने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा बदनामीचे काम सुरू केले आहे. असा आरोप मायाताई माने यांनी केला आहे.यामूळे महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री.संजय गाते यांच्या आदेशाने भाजप प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्या सौ.माया माने सौ. विजया वडेपल्ली,अनुराधा खरे, सौ.सुरेखा राठोड,सौ.अंजली वळसा,संगीता खंदारे,कस्तुरी मेरुगु,उषा शिंदे,श्रेया लिंबोळे व इतर महिला पदाधिकारी यांनी दि.11 मार्च रोजी माढा तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर महिले विरुद्ध चौकशी करून तिला तात्काळ अटक करावे याकरिता मागणी केली आहे.यावेळी प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या सौ.माया माने,तालुकाध्यक्ष माढा पूर्व मंडळ योगेश पाटील, सरचिटणीस दत्ता जाधव, अनंत राऊत संयोजक माढा लोकसभा, अतुल फडतरे कुर्डूवाडी शहराध्यक्ष, मेजर अर्जुन माने, माजी सैनिक संघटना सेल उपाध्यक्ष व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.