मुंबई (प्रतिनिधी):-बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संपूर्ण भारत तसेच देशात अनेक बौद्ध राष्ट्र व इतर राष्ट्रातील नागरिकांनी शांतपणे आंदोलन सुरू केल आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथील तमाम बौद्ध बांधवांनी देखील महाबोधी महाविहार बचाव समन्वय समितीची सर्व बुद्ध विहार व तमाम आंबेडकरी पक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे.
आज रविवार दि.१६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बुद्ध प्रतिष्ठान,वाशी येथील बुद्ध विहारा पासून ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत शांती मोर्चा नेण्यात आला यावेळी उपासक व उपासीकांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते व हातामध्ये फलक घेऊन 1949 चा कायदा रद्द करा,महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी करत अत्यंत शिस्तबद्ध व शांतीपूर्ण वातावरणात हा मोर्चा पार पडला.बोधगया महाविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान तसेच प्रेरणास्थान आहे असे असताना त्यावर बौद्ध धम्मियांचा हक्क असताना त्यांना डावलण्यात येत आहे त्यांचे अधिकार काढून घेण्यात येत आहे हा अन्याय बौद्ध बांधव कदापी सहन करणार नाही आणि आपल्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी ते एकत्र येत आहेत हे भारत सरकारला दाखवणे व आम्हाला आमचा अधिकार मिळालाच पाहिजे या हक्कासाठी लढा देत आहेत.आपल्या महाबोधी महाविहारावर कायद्याच्या कुबड्या घेऊन अतिक्रमण करत असतील तर ते कदापी सहन केले जाणार नाही त्या अनुषंगाने महाबोधी महाविहार बचाव समितीच्या वतीने सरकारला यावेळी निवेदन सादर करण्यात आले.