अहिल्यानगर (प्रतिनिधी):-क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा फुले दांपत्याने सामाजिक आणि लैंगिक विषमतेविरुद्ध दीडशे वर्षांपूर्वी धाडसाने संघर्ष केला.भारतीय संविधानात प्रस्तावने पासूनच परिपूर्ण न्याय आणि समग्र समतेचा आग्रह धरण्यात आला.तथापि वर्तमान स्थितीत लैंगिक समानता आणि अत्याचार मुक्तीसाठी प्रत्येक स्त्रीला सावित्रीबाई व्हावे लागेल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.येथील मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळातर्फे कर्तुत्वशाली महिलांचा आज गौरव करण्यात आला.
लेक सावित्रीची,ज्योत प्रकाशाची,हे घोषवाक्य असलेला हा कार्यक्रम स्नेहालय संस्थेच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमात सौ. भाग्यश्री पाटील यांनी बीजभाषण केले.अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर खेडकर होते. मंडळाचे प्रमुख सल्लागार निवृत्त प्राचार्य डॉ. खासेराव शितोळे, सचिव नंदेश शिंदे,स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या संचालक डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आदींनी यावेळी संवाद केला.शिक्षण ,सामाजिक प्रबोधन आणि कार्य , रुग्णसेवा या क्षेत्रातील समर्पित महिलांना पुस्तक, सन्मानपत्र इ. देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य शितल शहादेव बांगर,कल्पनाताई भामरे ,आगडगाव येथील भैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त सौ. चंद्रकला चंद्रकांत खाडे ,विमा क्षेत्रात कार्यरत सौ.जयश्री विष्णू देशमुख ,प्रा.गीतांजली खाडे ,ज्येष्ठ आदर्श शिक्षिका इंदुबाई प्रभाकर खेडकर ,सौ. वर्षा भाऊसाहेब कबाडी,सौ.नीलिमा विनायक कांबळे, सौ. कविता अरुण पवार,सौ. मनीषा नंदेश शिंदे ,सौ.सविता भाऊसाहेब पालवे,वीरपत्नी श्रीमती आशाताई साठे ,सौ. कुमुदिनी खासेराव शितोळे ,सौ. अनुपमा श्रीकांत वाखारे ,सौ. सपना अजित कुलट, यांना सौ.प्रणाली धर्माधिकारी, यांना यावेळी गौरविण्यात आले.
न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की,शिक्षण हक्क कायदा, अन्न अधिकार, आरोग्य अधिकार, ग्रामीण जलसंधारण आणि जल पुनर्वापर याबाबत झालेले शासकीय आणि अशासकीय क्षेत्रातील काम ,यांचा महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. तथापी स्त्रियांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन , त्यांचा समाज व कुटुंबातील दर्जा यांबद्दल पुरुषप्रधान समाजाचे पूर्वग्रह बदलण्याचे आव्हान भारतात मोठे आहे. दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ, स्नेहालय यांच्यासारख्या स्वयंसेवी संस्था आणि विधी सेवा प्राधिकरणासारख्या शासकीय संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा अंधार दूर होऊ शकेल.नगरपंचायत समितीमधील गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी प्रास्ताविक तर मनपा मधील आदर्श शिक्षक भाऊसाहेब कबाडी यांनी सूत्रसंचालन केले.
सौ.संगीता सानप जनसंपर्क कार्यकारी अधिकारी स्नेहालय मो.9011020178