एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच…अॅड.तांबे यांची मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात लेखी तक्रार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- राज्य परिवहन महामंडळ नगर विभागातील विभागीय कार्यालयामध्ये विभागीय लेखा अधिकारी गेल्या 15 ते 20 दिवसापासून रजेवर गेले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विभागीय लेखा अधिकारी पेन्शन धारकांची पेन्शन चालू होण्यास विलंब होत आहे असा आरोप अॅड.पांडुरंग तांबे यांनी केला आहे.
याबाबत विभाग नियंत्रण यांच्याकडे वारंवार सविस्तर लेखी तक्रार करून देखील आत्तापर्यंत विभाग नियंत्रण जगताप यांनी देखील कोणत्याही तक्रार अर्जाची दखल व कार्यवाही कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर केली नाही. यामध्ये मनमानी कारभार चालू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.राज्य परिवहन महामंडळ कामकाजामध्ये चालक व वाहकाला फक्त दोषी धरले जाते.परंतु कोणते अधिकार वर्ग व विभागीय कार्यालय मध्ये कर्मचाऱ्याला आतापर्यंत दोषी धरले गेलेले नाही.
विभागीय कार्यालयात असणाऱ्या अधिकारी याची बाजू विभाग नियंत्रक घेतात व त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्य परिवहन महामंडळ परिस्थिती खालवण्यास अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार हेच मूळ कारण आहे. या बाबत मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांकडे लेखी तक्रार केलेली आहे, असे अॅड.तांबे यांनी म्हटले आहे.