काकडवाडीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत..चाळीस हजाराहून अधिक भाविकांचा पालखी पायी दिंडी सोहळ्यात सहभाग यंदा वारकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी…
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-185 वर्षाची पालखीची परंपरा कायम राखत श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरकडे हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळा सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आश्विनाथ गड डोंगर परिसरात दाखल होताच लेझीम पथक,फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांच्या वर्षावात अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्यात हजारोच्या संख्येने भाविक वारकरी सहभागी झाले आहेत.पारेगाव बुद्रुक येथील आश्विनाथ गड डोंगर परिसरात दिंडी व पालखी सोहळा नगर जिल्ह्यात दाखल होताच हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पदाधिकारी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करीत पालखीचे दर्शन घेतले.आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सहित पदाधिकारी, ग्रामस्थ पालखी व दिंडीच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
यानिमित्ताने हजारो वारकरी खांद्यावर भगव्या पताका घेत, हरिनामाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात दिंडीत तल्लीन झाले. दिंडीच्या स्वागतासाठी पारेगाव बुद्रुक येथे ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखीने पारेगाव बुद्रुक येथे मुक्काम केला.ही पालखी सकाळी पुढे मार्ग क्रमण करत काकडवाडी गावात पोहचली या वेळी असून या पालखीचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केल आहे.निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गास राज्य दर्जा मिळून रस्ता दर्जेदार व्हावा दिंडीचे चालक मोहन महाराज बेलापूरकर यांच्यासह काकडवाडी ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली आहे.