राधाकृष्ण नगर परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी..जीव मुठीत घेऊन राहायची आली वेळ..
आशा मोरे/कर्डक (नाशिक प्रतिनिधी):- गेली दोन ते तीन दिवस सलग झालेल्या संततधार पावसाने अक्षरशा जिल्ह्यात थैमान घातले आहे.त्यात प्रभाग क्रमांक 10 मधील राधाकृष्ण नगर परिसरातील साई क्षितिज अपार्टमेंट परिसरा जवळ पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
यामुळे नागरिकांना अक्षरशा जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे घरात पाणी शिरल्याने रहाण्याची सोय नसून किचनमध्ये ही पाणी शिरल्याने स्वयंपाक करणे ही अवघड झाले आहे.नाशिक महापालिकेने येथे चेंबर टाकून पाईपलाईन केली आहे मात्र हे पाणी ड्रेनेजलाईन मध्ये जात नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.वास्तविक पाण्याला योग्य उतार देणे गरजेचे होते त्याने सदरील झालेली घटना टळली असती मात्र पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन मध्ये योग्य उतार न दिल्यामुळे या परिसरात पाणी साचत आहे.
महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे आणि नागरिकांच्या घरात शिरत असलेले पाणी चेंबरमध्ये जाण्याची व्यवस्था पुन्हा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.अन्यथा परिसरातील सर्व नागरिक महापालिका आयुक्त यांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा संतप्त नागरिकांनी यावेळी दिला आहे.