वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):-सालोड येथे तार एकमेकांना घासल्यामुळे स्पार्किंग्ने शामपूर येथील शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना दिनांक १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. येथील किशोर झोड हा शेतकरी आपल्या शेतात दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवतो यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे पीक काही हाती आले नाही व उत्पन्न काही मिळाले नाही. त्याने असे झाल्यानंतर खचून न जाता कर्ज काढून आपल्या शेतात गहू पेरला गहू काढायला आला असता तर स्पार्किंग होऊन जाळाच्या ठिणग्या गव्हात पडून संपूर्ण गहू जळून खाक झाला.तोंडचा घासच गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गव्हाची भरपाई मिळण्यासाठी किशोर झोड हा शेतकरी तहसीलदारांकडे पंचनामा करून नुकसान भरपाई मागणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Trending Topics:
Trending
- लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
- अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी,कुठे घडली घटना वाचा सविस्तर
- मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
- एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
- संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
- गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
- नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!