निर्घृणतेची सीमा ओलांडली..! शहरात धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरून खून.. धक्कादायक…कारण…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव येथील भारत बेकरी जवळील कौस्तुभ कॉलनीत १२ डिसेंबर रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.सुमारे 40 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.पहाटेच्या सुमारास ही महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या कोणी व कोणत्या कारणातून केली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.या निर्घृण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.तोफखाना पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
