अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ एप्रिल):-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दि.१३ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ” बालघर प्रकल्प ” अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेत जेवण देण्यात आले.या वेळी नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे,जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप,ज्येष्ठ सल्लागार जिवन पारधे सर,ज्येष्ठ नेते पोपटदादा जाधव,शहर उपाध्यक्ष अमर निरभवने, माथाडी जिल्हा सरचिटणीस सुनिल भिंगादिवे,युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल काळपुंड,महीला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्रीताई शेंडगे,भिंगार उपाध्यक्ष बबलु भिंगारदिवे उपस्थीत होते.यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्था संचालक श्री. युवराज गुंड सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ राळेभात मॅडम यांनी मानले . MSW चे विद्यार्थी आशिष अहिरे,समाधान शिंदे,दर्शन गोडे,विवेक कोल्हे,मानली जाधव,संजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

