श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१८ ऑगस्ट):-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु.सायली सुशीलकुमार गोरे हिने इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीरामपूर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.तिच्या या यशाबद्दल जनसेवा मंडळ नायगाव स्वर्गीय बाळासाहेब लांडे पाटील मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक लबडे सर व इतर शिक्षक वृंद यांचेही नायगाव ग्रामस्थांनी व शालेय व्यवस्थापन समिती यांचे कडून सायलीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.यावेळी ॲड.श्री प्रशांत राशिनकर म्हटले की ग्रामीण भागाचे नाव उच्चस्तरीय नेण्याचे काम या विद्यार्थिनी केले आहे ग्रामीण भागात अनेक समस्या आणि अडी अडचणीला सामोरे जाऊन या विद्यार्थिनी यश संपादन केले आहे. नक्कीच नायगावचे नाव तालुकास्तरीय उंचावल्याने समस्त गावकऱ्यांना याचा अभिमान आहे.
