प्रतिनिधी (दि.७ सप्टेंबर):- मराठा समाजातील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे.त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रभर आंदोलने सुरु आहेत.
व त्यांच्या भेटी साठी महाराष्ट्रभरातून नेतेमंडळी भेटायला येत आहे.दरम्यान आंदोलकांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला आहे.विशेष म्हणजे राज्य सरकारने कालच याबाबत घोषणा केली होती.ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं.
त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत जीआर काढलाय. सरकारने मनोज जरांगे यांना पत्र पाठवलंय.या पत्रात सरकारने जीआरबाबत माहिती देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
