अहमदनगर (दि.२ प्रतिनिधी):-नगर शहरात असलेल्या वाडियापार्क येथील जलतरण तलावात आज सकाळी सागर कळसकर यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वाडियापार्क जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.मात्र या मृत्यूमागे जलतरण तलावाच्या ठेकेदारांचा कुठलाही निष्काळजीपणा नसून हा केवळ अपघात असल्याचे ठेकेदारांनी सांगितले आहे.जलतरण तलावात प्रशिक्षित स्टाफ असून ठिकठिकाणी नियमांचे फलक लावलेले आहे.इतकेच नाही तर वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत.
त्याच प्रमाणे पोहायला येणाऱ्या सर्वांची गंभीर दखल याठिकाणी घेतली जाते.त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे तलावाच्या प्रशाशनाचा कोणताही हलगर्जीपणा नसून तलावाच्या ठेकेदारांवर आरोप करू नये अशी विनंती जलतरण तलावाच्या ठेकेदारांनी केली आहे.