संगमनेर प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव:-१९ व्या शतकात तमाशा क्षेत्रामध्ये प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर होय.त्या काळात पुरुषप्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेचा पगडा होता.
सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती,आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून नामचंद पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले.त्यांनी पठ्ठे बापूराव बरोबर महाराष्ट्रभर सर्वत्र वगनाट्य लावण्या सादर केल्या.छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील राजदरबारा मध्ये मिठाराणीचे वगनाट्य पवळा भालेराव व पट्टे बापूराव यांनी सादर केले आहे.महाराष्ट्र शासनाने सन 2022 मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्काराला त्यांचे नाव देऊन सन्मान केला आहे.
अशा कलेच्या महान सम्राज्ञी आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्याचे मागणी कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यानुसार नामचंद पवळा यांच्या जन्म गावी ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी प्रजासत्ताक दिनी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्याचे मागणी कला सम्राज्ञी पवळा कलामांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.त्यानुसार आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारस करण्याची मागणी करणारा ठराव सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी ग्रामसभेत मांडला.
सदरचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी पवळा भालेराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ऐतिहासिक ठरावस मंजूर केला आहे.पवळा भालेराव हिवरगावकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास हिवरगाव पावसा तसेच संगमनेर तालुका अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावणार आहे.तसेच महाराष्ट्रातील तमाशा लोककलेच्या इतिहासात
एक सोनेरी अध्याय लिहिला जाणार आहे.त्यामुळे कलेच्या महान सम्राज्ञीचा उचित व योग्य सन्मान भारत सरकार यांच्याकडून झाल्यास लोककला क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण ठरेल अशी भावना हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.सदर ग्रामसभेस अध्यक्ष सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,केशव दवंगे,पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने घेतलेल्या ऐतिहासिक ठरावा बद्दल ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,रघुनाथ भालेराव सर,अरुण खरात,राजेश गायकवाड,पत्रकार महेश भोसले,पुरवठा निरीक्षक संदीप निळे,डी.के.गायकवाड, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे,सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,बच्चन भालेराव,संजय भालेराव,मन्सूर इनामदार,कैलास दिवटे,के.एस.गायकवाड,अशोक भालेराव,रंजना भालेराव,सुयोग भालेराव,अभिजीत भालेराव,शैला भालेराव,रोहिणी भालेराव,हितेन संगरे,लहानु भालेराव,सत्यजित भालेराव,राजू दारोळे,बाबासाहेब कदम,विलास कदम,भाऊसाहेब निळे,विजय निळे,दिलीप चबुकस्वार,गुलाब भालेराव,राजू भालेराव,राजेंद्र भालेराव,संजय डहाणे, भाऊसाहेब बोऱ्हाडे,यादव भालेराव,प्रा.छबन मुंतोडे,अर्जुन मुंतोडे,सुनील मुंतोडे संतोष भालेराव,बाबसाहेब भालेराव, दिपक भालेराव,समधन भालेराव,नारायण मोकळ,विकास दारोळे,यांच्यासह हिवरगाव पावसा ग्रामस्थ,कलाप्रेमी नागरिक यांनी ग्रामपंचायतचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.