सोलापूर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखल फेक करून बदनामी करण्याचे षडयंत्र करत आहे.या प्रकरणाला जवळजवळ दहा वर्ष उलटून गेले आहेत आणि सदर केसमध्ये न्यायालयाने मंत्री गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीपण सदर महिला पुन्हा पुन्हा एकदा प्रकरण उकरून काढून जयकुमार गोरे यांची बदनामी करत आहे.
यामूळे महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री.संजय गाते यांच्या आदेशाने भाजप प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्या सौ.माया माने सौ. विजया वडेपल्ली,अनुराधा खरे, सौ.सुरेखा राठोड,सौ.अंजली वळसा,संगीता खंदारे,कस्तुरी मेरुगु,उषा शिंदे,श्रेया लिंबोळे व इतर महिला पदाधिकारी यांनी दि.10 मार्च रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर महिले विरुद्ध चौकशी करून तिला तात्काळ अटक करावे याकरिता मागणी केली आहे.यावेळी प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या सौ.माया माने,सौ.विजया वडेपल्ली,सौ.संगीता खंदारे,सावित्री पल्लाटी, सौ.अंजली वळसा, सौ.सुरेखा राठोड,सौ.कस्तुरी मेरुगु,सौ.सविता कस्तुरे,सौ.अनुराधा खारे,सौ.उषा शिंदे,सौ.श्रेया लिंबोळे,गीता लिंबोळे,अर्जुन माने,सोपान खारे,संजय लिंबोरे,नामदेव वेळवे,शुभम राठोड यांच्यासह पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला व पुरुषवर्ग हजर होते.