तुळजापूर (प्रतिनिधी):-पोलीस व जनता यामध्ये मैत्रीचं नातं जोपासणे,महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, सर्वसामान्य माणसांना हक्क मिळवून देणे,सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न करणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे इ.विविध समाज उपयोगी कामे महाराष्ट्र पोलीस मित्र संघाच्या वतीने केले जातात.अशी माहिती महा पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अनिताताई लष्करे यांनी दिली.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रथमता त्यांना संघटनेचे उद्दिष्ट समजून सांगण्यात आले व लोकहितासाठी संघटना चालविणे व वाढविणे ही नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असे सौ.लष्करे म्हणाल्या.यावेळी सौ.अनिता म्हस्के यांची सोलापूर शहर अध्यक्षपदी तर वार्ड क्रमांक दोनच्या अध्यक्षपदी ज्योतीताई कंदारे यांची निवड करण्यात आली असून तसें त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.