गोरेगांव (ॲड.प्रवीण तांबे):-पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा जुन्या आठवणींना उजाळा देत हास्य,विनोद,व विविध गुणदर्शन दाखवत रंगला २००४-२००५ या वर्षातील वीस वर्षानंतर विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.आपल्या गुरुप्रती आदरभाव व्यक्त करत अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता मधून दाटून आलेल्या उत्कठ भावनांना वाट मोकळी करून देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. विठ्ठल गायकवाड सर हे होते. यावेळी विचार मंचावर शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री.जावळे सर,श्री धोंडीभाऊ तांबे सर,श्री. कैलास खिलारी सर,श्री.रामचंद्र सुपेकर सर,श्री.वाळेकर सर,श्री. पिंपळे सर,श्री.दरेकर सर,श्री. चव्हाण सर,श्री.इनामदार सर,श्री.शिंदे सर,श्री.काळे सर,श्री.चौरे सर,काकडे सर,श्री. दळवी सर,श्री.नरसाळे सर,श्री कुटे मामा ,श्री काकडे मामा आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षकांना ट्रॉफी, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या गुरु विषयी शाळेत असताना जी आदरयुक्त भीती होती ती आजही कायम असल्याचे विद्यार्थ्याने आपल्या भाषणात सांगितले. गुरु हे शिक्षण देत नसून ज्ञानाचा चिरंतन ठेवा देत असतात ती प्रत्येकाच्या आयुष्याची पुंजी म्हणून प्रत्येकाला पुरेल एवढे ज्ञान देत असतात. शाळा चांगली असली म्हणजे विद्यार्थी शिकतातच असं नाही तर, विद्यार्थी चांगले असेल तर ते कुठल्याही शाळेमध्ये शिकू शकतात, गोरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या क्लासची सोय नाही तसेच अवांतर अभ्यासाची साधने नाहीत, पालक हा ग्रामीण भागातला शेतकरी असून तरीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग शाळेमध्ये पाहायला मिळतो तसेच अनेक शिक्षक, वकील, शास्रज्ञ , इंजिनिअर ,तलाठी,आदर्श प्रगतशील शेतकरी,उत्तम व्यवसाय पर्यंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे शिक्षक म्हणून आम्ही धन्य झालो अशा भावना श्री विठ्ठल गायकवाड सर यांनी अध्यक्षीय भाषणांमधून तर श्री.तांबे सर, श्री सुपेकर सर ,पिंपळे सर,श्री.वाळेकर सर, श्री.वाळेकर सर ,श्री खिलारी सर, श्री शिंदे सर,श्री चव्हाण सर यांनी भाषणांमधून सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून सरांचे मनस्वी अभिनंदन करत आपल्या गुरु विषयी आदरभाव व्यक्त केला. माजी विद्यार्थी भागुजी तांबे, शोभा नांगरे,प्रशांत नरसाळे,बापू शिंदे, शिवगणराज काकडे ,जयेश काकडे,खंडू शिंदे,शशिकला तांबे,संदीप परभाने,धनजंय नांगरे इ.माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्यासपीठवर उपस्थित सर्व शिक्षकांच्या ट्रॉफी ,गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी रुपये ५ सी सी टी व्ही कॅमेरे सेट शाळेसाठी भेट दिले व दरवर्षी शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाची नियोजन जबाबदारी श्री .जयेश काकडे, ॲड. श्री.पांडुरंग तांबे , श्री धनंजय नांगरे श्री.गीतराम नांगरे ,श्री. गणेश तांबे ,माधुरी तांबे व संध्या नरसाळे यांनी घेऊन नियोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्या मुळे नियोजनबद्ध कार्यकमाची चर्चा सर्वत्र होत आहे. २० वर्षा नंतर झालेला स्नेह मेळावा शिक्षक व माजी विद्यार्थ्यांयांचे उपस्थित आनंदीय वातावरणात पार पडला.कार्यक्रम मध्ये संगीत खुडची कार्यक्रमाचे आयोजन केले होत त्यामध्ये मुली मधून प्रथम क्रमाक प्रिती थोरात द्वितीय क्रमाक शोभा नांगरे तृतीय क्रमाक सुरेखा नरवडे यांनी पटकवला त्यांना येवला पैठनी साडी देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मुला मधून प्रथम क्रमाक जयेश काकडे द्वितीय क्रमाक पांडुरंग तांबे , तृतीय क्रमाक विशाल चौधरी यांनी पटकावला त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना श्री गणेश तांबे ने मांडली तर श्री धनजंय नांगरे यांनी अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन दिले. कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री जयेश काकडे व माधुरी तांबे यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ॲड.श्री पांडुरंग तांबे व संध्या नरसाळे यांनी केले.