नगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हापरिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग या नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहाची दुरुस्तीचे कामे अपूर्ण व न केलेल्या कामाचे बिल परस्पर संगनमताने काढणाऱ्या कनिष्ठ अभियंता,कनिष्ठ सहाय्यक,उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासन सेवेतून निलंबित व बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनी जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यासहित दि.22 मे 2025 रोजी निवेदन दिले होते.
सदर निवेदनाची दखल घेऊन जिल्हापरिषदेने आव्हाड यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे.व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या पत्रानुसार समितीने तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसे पत्र तक्रारदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनाही देण्यात आले आहे.अखेर आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.