माढा (प्रतिनिधी):-‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी सहभाग नोंदवून आपल्या मूळगावी विठ्ठलवाडी येथे परतल्यानंतर नाईक आकाश खरात यांचा सौ. माया माने भाजप प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्या व महिला मोर्चा अध्यक्षा माढा पूर्व मंडल व सुभेदार मेजर (से.नि) अर्जुन माने यांच्या हस्ते गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नाईक आकाश खरात म्हणाले की,मी सात वर्षांपूर्वीच भारतीय लष्करात दाखल झालो. तेव्हाच देशाच्या संरक्षणासाठी लढण्याची माझी इच्छा व जिद्द मनात होती.ती इच्छा ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानच्या काळात पूर्ण झाली.युद्ध काळाचा अनुभव सांगताना ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानी ड्रोन अगदी आमच्या जवळून जात असताना व पाकिस्तानी सैनिकाकडून सीमेवर होत असलेला गोळीबार यांनी कधीही आम्ही विचलित झालो नाही.आणि त्यास सडेतोड उत्तर देत राहिलो.त्यावेळी आमच्या सर्व सैनिकाच्या मनात फक्त जिंकण्याची जिद्द होती.
आणि शत्रूचा खात्मा करून देशाचे संरक्षण करणे या एकाच विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्व सैनिक लढत होतो.त्यामुळे आपल्या शौर्याचा व पराक्रमाचा विजय झाला.अशावेळी देशाचे संरक्षण करण्याची ही बहुमोल संधी मला मिळाली,हे मी माझे भाग्यच समजतो.यावेळी गावच्या सरपंच सौ.मोनिका खरात,ग्रा.प सदस्य रामचंद्र भांगे,पोलीस पाटील बालाजी शेगर,सुरेश शेंडगे सर,राजाभाऊ कदम सर, राजेंद्र खरात, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे, मेजर बालाजी कदम, पुजारी बाळू खंडेकर, रमेश बरकडे,दत्तू बरकडे, तानाजी बरबडे, शिवाजी बरकडे,गणेश सस्ते, बबलू नागटिळक, राजश्री शेंडगे , रंजना कदम, सुषमा मोटे, बिनू खरात, संगीता बरकडे, मनीषा खांडेकर व मोठ्या संख्येने इतर महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता.