नगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हापरिषद मधील नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहाची दुरुस्ती अपूर्ण कामाचे व कामे न केलेल्या बिलाचे संगनमताने अपहार केल्याप्रकरणी जिल्हापरिषदेमार्फत तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन जणांची सदस्य समिती नेमण्यात आली होती परंतु आठ दिवस होऊन देखील समिती सदस्यांनी, अध्यक्षांनी अद्यापपर्यंत कुठलीही ठोस अशी कारवाई केली नसून सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आवाज उठवला परंतु समिती अधिकाऱ्यांनी ठोस अशी कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांनी संतप्त होत प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच त्या स्वच्छतागृहाचे कामांचे बिल 31 मार्च 2025 रोजी काम न करता अपूर्ण कामाचे बिल परस्पर काढल्याचे उपअभियंता नगर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता ढेरे यांचे कडील असलेला पदभार तातडीने काढण्यात आला असल्याचे समजले परंतु चौकशी समिती नेमून आठ दिवस झाले तरी संबंधित कामाचे कागदपत्र अद्याप चौकशी समितीने हस्तगत केले नाही आणि कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा कारवाई न केल्याचे समजते यावरून असे समजायचे की समिती अध्यक्ष व सदस्य वेळकाढू पणा करत असून संबंधित कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना वाचवत आहे अशी चर्चा दबक्या आवाजात कर्मचाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये सुरू असल्याचे समजतेय,पाहूया चौकशी समिती अध्यक्ष व समिती सदस्य तात्काळ कोणती कारवाई करतायेत का नाही.याबाबत जिल्हापरिषदेचे नुकताच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली असल्याची माहिती रोहित आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.