संगमनेर प्रतिनिधी (दि.3 डिसेंबर):-जिल्ह्यातील कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास पिकअप,ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले.या अपघातामुळे वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पसार झाला.त्यामुळे पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पिकअपचा आणि चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलिस करीत आहेत.
Trending Topics:
Trending
- केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर,आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी
- स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..बंदुकीतून फायरिंग करणारी सहा आरोपींची टोळी 24 तासाच्या आत जेरबंद
- सावेडी उपनगरात गोळीबार एकच खळबळ..
- पत्रकार दत्तात्रय घोलप समाजरत्न पुरस्काराने सन्मानित सिनेअभिनेते मकरंद अनासपुरेंच्या हस्ते सन्मान.!!
- जिल्हापरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या चौकशीस विलंब का? आठ दिवस उलटून ही ठोस अशी कारवाई नाहीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांचा आरोप
- तुम्ही कसे काम करता तेच पाहतो असे म्हणत.. महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की करून शिवीगाळ करणारे आरोपी अवघ्या तीन तासातच कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
- ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये सहभागी होऊन देशासाठी लढणारे विठ्ठलवाडी येथील सैनिक आकाश खरात यांचा भव्य सत्कार..
- विठ्ठलवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी