https://youtu.be/r8ZMM6O092o
अहमदनगर प्रतिनिधी:-पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्या विरोधात शेतकरी कर्जमाफी योजनेचा चुकीचा लाभ घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश राहता येथील प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी दिला आहे.अशी माहिती प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी किशोर भांड,अमृतराव धुमाळ,याचिका कर्ते दादासाहेब पवार हे उपस्थित होते.विखे पाटील कारखान्याने सन 2004 मध्ये बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडिया या बँकाकडून ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना बेसल डोस देण्याचा नावाखाली 4.65 कोटी व 2.50 कोटी कर्ज घेतले होते.या संदर्भात अधिक माहिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू यांनी दिली.