अहिल्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-अहिल्या नगर जिल्ह्यातील पोखर्डी (ता.नगर) येथे मनाला चटका ,लावणारी घटना घडली आहे.पतंग उडविताना विहिरीत पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी (दि.२७ डिसेंबर) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे.
अनिकेत रत्नदीप आल्हाट,(वय १२), दिनेश विशाल देठे, (वय ९.दोघे रा,पोखर्डी ता.जि.अहिल्यानगर), अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.पोखर्डी शिवारातील दर्याबाई परिसरात अनिकेत व दिनेश हे दोघे पतंग उडवीत असताना पतंग विहिरीत पडला.तो पकडण्यासाठी पळाले असता एक जण विहिरीत पडला.त्याला वाचविण्यासाठी दुसरा मुलगा पळाला. तो ही विहिरीत पडला.येथे जवळ असलेल्या इतर लहान मुलांनी आरडाओरडा केला.
तेव्हा तेथील नागरिकांनी धाव घेतली.त्या मुलांना विहिरीतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र,तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वी त्यांना मयत घोषित केले.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.