रायगड (प्रतिनिधी):-“वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा” हे घोष वाक्य असलेले विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात मोठा नावलौकिक प्राप्त केलेले ‘रायगड मी मराठी प्रतिष्ठान’ प्लास्टिकमुक्त गाव अभियान राबविणार आहे. आपले प्रत्येकाचे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी व भविष्यातील धोके टाळण्यासाठी जनजागृतीचा महत्वपूर्ण एक भाग आहे.अनेक गावात कचऱ्याची गाडी येत नाही.
त्यामुळे गावकरी चाकरमानी गावात विविध कारणाने विविध प्रकारचे प्लास्टिक आणतात पुढे ते उघड्यावर टाकले जाते. त्यातून ते विविध ठिकाणी पसरते अनेकवेळा पाळीव जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होतो. हवेमुळे शेतात जंगलात पसरले जाते त्याचे विघटन होत नसल्याने जमीन नापीक होते. अनेक वनस्पतींना त्याचा त्रास होतो.तसेच हवेमुळे विहिरी तलाव ह्या ठिकाणी पोहचून पाणी दूषित करते,म्हणजेच मानवी आरोग्याला हानिकारक ठरते. त्यामुळे आपल्या गावच्या वेशीवर प्रत्येक गावाने सूचना फलक लावून प्लास्टिकमुक्त गाव असा उल्लेख करून गावात कोणीही प्लास्टिक आणु नये खास करून कॅरीबॅग,तसेच गावच्या वेशीवर जमिनीपासून 1 फूट उंचीवर खाली सिमेंट काँक्रीटचा थर असलेली वरती चारही ४ बाय ४ चे बांधकाम प्लास्टिक जमा करण्यासाठी वरच्या बाजूने थोडी जागा ठेऊन वरती आवरण टाकून टाकी बंद करावी
त्यांनंतर हप्ता हप्त्याने टाकीतील प्लास्टिकचे दहन करावे.जेथून प्लास्टिक टाकू तेथून धूर निघून जाईल थोडे वायू प्रदूषण होईल.परंतू प्लास्टिक इतरत्र पसरवून होणारी हानी आपण टाळू शकतो. तसे आताच जनजागृती नाही केली तर पुढील काही वर्षांनी अनेक जमिनी नापीक होतील जंगल नष्ट होतील, जनावरे मृत्युमुखी पडतील, गावकऱ्यांमध्ये आजाराचे प्रमाण वाढून आरोग्य धोक्यात येईल. ह्या अभियानाला पाठिंबा देताना प्लास्टिक मुक्त गाव अभियानात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. असे आवाहन रायगड मी मराठी प्रतिष्ठान चे सचिव प्रफुल तटकरे यांनी केले आहे. व त्याचा गावोगावी प्रसार करणार असल्याचे सांगितले आहे.