संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील विशेषत डोंगर भागातील कुंभारवाडी (वरवंडी) तसेच जोंधळवाडी (दरेवाडी) परिसरातील नागरिकांना नेटवर्क उपलब्ध नसल्याने खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांच्या माध्यमातून आजी/माजी लोकप्रतिनिधी,पालकमंत्री,उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री,राज्यपाल,प्रधानमंत्री,राष्ट्रपती यांच्या बरोबरच दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदनामार्फत कळविण्यात आले होते.
राहुल ढेंबरे पाटील

त्यावर उपाययोजना म्हणून टेलिकॉम कंपन्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले,परंतु संबंधितांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता दूरसंचारमंत्रालयाला चुकीचा अहवाल सादर केल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाबरोबरच केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने टेलिकॉम कंपन्यांना संबंधित गावांचा नेटवर्क समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभारवाडीला नवीन प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दि.२९ मे २०२५ रोजी दिला असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने कळविले आहे.
परंतु दरेवाडी मध्ये जरी जिओ टॉवर असला तरीदेखील दरेवाडीचाच भाग असलेल्या जोंधळवाडी परिसराला त्याचे नेटवर्क पोहचत नसल्याचे निदर्शनास आणून देत जोंधळवाडी परिसराचा देखील नवीन प्रोजेक्टमध्ये समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी केल्यानंतर संबंधित विभागाने यास अनुकूलता दाखवली असून लवकरच कुंभारवाडी,जोंधळवाडी संपुर्ण परिसर केंद्र शासनाच्या नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून नेटवर्क मध्ये येणार असल्याचे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.