अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ डिसेंबर):-समाजात अर्थसाक्षरता निर्माण व्हावी तसेच सर्वसामान्यांना आर्थिक पत देण्याच्या उदात्त हेतून कार्यरत असलेल्या व्यंकटेश मल्टीस्टेटने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. दशकपूर्तीचा हा प्रवास अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद घेवून आला.अनेकांना आपली संपन्नतेची स्वप्ने साकार करता आली.बुलंद भारताची निर्मिती हे संस्थेचे ध्येय खऱ्या अर्थाने समाजाला भरभरुन देणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते तथा व्यंकटेश ग्रुपचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर सुबोध भावे यांनी केले.व्यंकटेश मल्टीस्टेटने तयार केलेल्या 2023 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच दशकपूर्ती लोगोचे अनावरण सुबोध भावे यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे,सहसंस्थापक कृष्णा मसुरे,सहसंस्थापक व्यंकट देशमुख,सहसंस्थापक अनिल गुंजाळ,मार्केटिंग ॲण्ड डेव्हलपमेंट हेड ज्ञानेश झांबरे आदी उपस्थित होते.अभिनाथ शिंदे यांनी सांगितले की, व्यंकटेश मल्टीस्टेटची सुरुवात 10 बाय 10 च्या कार्यालयात झाली.आम्ही सगळे नवीन होतो. कोणताही पूर्वानुभव नव्हता.त्यामुळे सगळीकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या.आम्ही ध्येय निश्चित केल्यावर प्रत्यक्ष कृती केली होती.त्यामुळे आमचा आमच्यावर विश्वास होता. नकारात्मक वातावरणातही आम्ही प्रवास चालू ठेवला. चढउतार पाहिले.एक एक पायरी चढत आज शिखरापर्यंत पोहचलो आहोत.या काळात आम्ही सर्वात मोठी कमाई कोणती केली असेल तर ती म्हणजे लोकांचा विश्वास.देश सशक्त संपन्न व्हायला हवा तर प्रत्येक नागरिक संपन्न झाला पाहिजे.हेच ध्येय समोर ठेवून सामान्य शेतकरी ते देशातील बड्या उद्योजकांपर्यंत आमची नाळ जोडलेली आहे.महिला सक्षमीकरणाठी संस्थेने राबविलेल्या योजना कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत.अर्थ साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बॅंक सुरू केली. उद्योग क्रांती उपक्रमातून युवा पिढीला उद्योग, व्यवसायाकडे वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.नोकरी मागण्या ऐवजी नोकरी देणारे बना हा मंत्र संस्था युवा पिढीला देत आहे.व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व्यंकटेश फौंडेशनचीही स्थापना केली.या मार्फत आपत्ती ग्रस्तांना ओंजळभर माणुसकी अंतर्गत धान्य वाटप केले.याशिवाय गोशाळा चालवून शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय शेती,गोपालनाचे महत्व पोहोचविले.त्याचे अतिशय चांगले परिणाम पहायला मिळत आहेत. या काळात संस्थेला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. एकूणच देशाच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलता येतोय याचे खूप समाधान आहे. भविष्यातही अशीच वाटचाल सुरू ठेवली जाईल.संस्थेच्या यशस्वी वाटचालीत माझे सर्व सहकारी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे.नवीन वर्षाची दिनदर्शिका सर्व सभासद, ग्राहकांना मोफत वितरित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.
Trending Topics:
Trending
- Crime..शहरात तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला..चौघांविरुद्ध गुन्हा दाखल गंभीर जखमी तरुण रुग्णालयात दाखल..
- Crime स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला..पोलीस जखमी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- शिवरायांच्या अपमानावरून महापालिकेत सभागृहात राडा.. नगरसेवक छिंदमला सत्ताधाऱ्यांनी बाहेरचा दाखवला रस्ता..!
- Crime…भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या कृत्यांचा घाणेरडा खेळ उघड..! पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी ‘त्या’ तिघांवर गुन्हा अहिल्यानगर पोलिसांची कडक कारवाई
- अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आदेश
- जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा भरपूर साठा तुटवड्याच्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा पोलिस विभागाच्या समन्वयाने थेट गुन्हे दाखल करणार कलेक्टर डॉ. पंकज आशिया
- पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला ७ वर्षांची सक्तमजुरी..!” निर्घृण मारहाण, संशय आणि मानसिक छळाचा शेवट न्यायालयीन शिक्षेत
- निष्काळजी ट्रॅक्टर चालकाला न्यायालयाची कडक शिक्षा..! अपघातात मृत्यू..आरोपीस १ वर्ष सक्तमजुरीसह १० हजाराचा दंड
