पारनेर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-पारनेर तालुक्यासह राज्यात पाझर तलावांचे वाढते जाळे हे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेचे फलीत आहे.तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या अगोदर चालु केलेल्या “आवाज दो” जन आंदोलनाच्या माध्यमातुन पाझर तलावांसह पुरातन जलस्त्रोंतांना पुनर्जिवीत कण्यासाठी शासणाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश ठरणारी “मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना” पाणीदार महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी बनली असुन गावागावातच नव्हे तर वाडीवस्तीवरील पुरातन जलस्त्रोतांना पुनर्जीवित करून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचा संकल्प करून बळीराजाच्या उज्वल भविष्य निर्माणच आपल्या सर्वांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी पाझर तलावांबरोबर पुरातन जलस्त्रोतांच्या दर्जेदार कामांसाठी जागरूक राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.पारनेर तालुक्याची ओळख राज्याला नव्हे तर देशाला समाजहिताच्या विविध चळवळींच्या माध्यमातुन निर्माण झालेली आहे पारनेर आणि दुष्काळ हे समीकरण बदलून सुजलाम सुफलाम आदर्श पारनेर तालुका निर्माणचा ध्यास उराशी धरून पाझर तलावांसोबत पुरातन जलस्रोतांना पुनर्जिवीत करण्यासाठी चालु केलेली चळवळ राज्याला दिशादर्शक ठरली असुन पारनेर तालुक्यासह राज्याने दुष्काळाच्या मोठ्या झळा अनुभवल्या आहेत आज सर्व स्तरावर सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतला जात असुन पारनेर तालुक्यतच नव्हे तर राज्यात सर्वत्र चाललेल्या कामांना दर्जेदार करून बळीराजाला सुवर्ण दिवस येण्यासाठी समाजाचे योगदान मोलाचे ठरणार असुन उभ्या जगाचा पोशिंदा सक्षम बनविणे ही आपली नैतिक जबाबदारीच नव्हे तर आपले कर्तव्य आहे.दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा चिंतणाचा विषय असून त्याचबरोबर विशेषकरून पठार भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कमी पाण्यावरची पिके घेवुन जमिनीच्या भुजल पातळीचे संरक्षण करून पाण्याची योग्य वेळी समयसुचकता राखुन बचत करून दुष्काळाचे आव्हान समोर उभे राहणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज असुन नागरिकांनी जलस्त्रोतांच्या निर्माण बरोबर भुजल पातळीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
Trending Topics:
Trending
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
- इचलकरंजीत सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या पठ्ठ्यांचा धमाका! थेट सुवर्ण,रौप्य अन् कांस्य पदकांची लूट!कराडच्या अर्णव,तनवीरा अन् रुद्रांशचा राज्यस्तरीय स्पर्धेत जलवा!
- 🏆लातूरमध्ये मलकापूरचा डंका! रोटरी क्लबने एकाच रात्री पटकावले तब्बल १३ मानाचे पुरस्कार..
- 🚨थरारक! कराडच्या ‘या’ रस्त्यावर अवघ्या १० मिनिटांत ७-८ दुचाकीस्वार घसरले..ट्रकच्या चाकाखाली जाता-जाता वाचले प्राण..! नागरिकांचा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा..
- मोठी बातमी..अहिल्यानगरकरांचे बोअरवेल कधीच आटणार नाहीत? महापालिकेला मिळाला ‘हा’ मास्टरप्लॅन!वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तुलसीराम पालीवाल यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले पत्र..
